नांदेड: एकीकडे राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील अपूर्ण कामे, खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, दुसरीकडे भा...
नांदेड: एकीकडे राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील अपूर्ण कामे, खड्डे आणि वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असताना, दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'सेवा नाही तर कर कशासाठी?' असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.महामार्ग की मृत्यूचा सापळा?
गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर NH-361 हा प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
सततचे अपघात: अर्धापूर मार्गावर चालत्या ट्रकने पेट घेणे (११ मार्च), विष्णुपूरी आणि लातूर फाटा दरम्यान दोन हायवा गाड्यांची भीषण धडक (२ मार्च) यांसारख्या घटनांनी महामार्गावरील सुरक्षिततेचे वाभाडे काढले आहेत.
अपूर्ण कामे: लातूर फाटा उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि वेगरोधक नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
प्रशासकीय निष्काळजीपणा: दाभड परिसरात १५ दिवसांत ३ मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी 'चक्का जाम' आंदोलन केले होते.
खड्ड्यांचे साम्राज्य आणि टोलचा भार
विशेष म्हणजे, महामार्ग १६१ (ए) वर गेल्या ८ वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तरीही टोल वसुली मात्र अत्यंत कडकपणे केली जाते. "रस्ते दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष, पण टोल वाढवण्यात तत्परता" अशी प्राधिकरणाची दुटप्पी भूमिका असल्याची टीका होत आहे.
१६ मार्चपासून लागू होणारे नवीन टोल दर (पाडी मक्ता टोल प्लाझा):
आजच्या एका नामाकिंत व्रतपत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार'
स्थानिक २० किमी अंतराच्या आतील बिगर व्यावसायिक वाहनांसाठी मासिक पास ३४० रुपये निश्चित करण्यात आला आहे.
'केवळ रस्तेच नाही, राष्ट्राचे निर्माण सुद्धा' हे घोषवाक्य मिरवणाऱ्या NHAI ने आधी प्रवाशांच्या सुरक्षेचे निर्माण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर NH-361 हा प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
सततचे अपघात: अर्धापूर मार्गावर चालत्या ट्रकने पेट घेणे (११ मार्च), विष्णुपूरी आणि लातूर फाटा दरम्यान दोन हायवा गाड्यांची भीषण धडक (२ मार्च) यांसारख्या घटनांनी महामार्गावरील सुरक्षिततेचे वाभाडे काढले आहेत.
अपूर्ण कामे: लातूर फाटा उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि वेगरोधक नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
प्रशासकीय निष्काळजीपणा: दाभड परिसरात १५ दिवसांत ३ मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी 'चक्का जाम' आंदोलन केले होते.
खड्ड्यांचे साम्राज्य आणि टोलचा भार
विशेष म्हणजे, महामार्ग १६१ (ए) वर गेल्या ८ वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तरीही टोल वसुली मात्र अत्यंत कडकपणे केली जाते. "रस्ते दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष, पण टोल वाढवण्यात तत्परता" अशी प्राधिकरणाची दुटप्पी भूमिका असल्याची टीका होत आहे.
१६ मार्चपासून लागू होणारे नवीन टोल दर (पाडी मक्ता टोल प्लाझा):
आजच्या एका नामाकिंत व्रतपत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिरातीनुसार'
| वाहनाचा प्रकार | एकेरी प्रवास (रु.) | परतीचा प्रवास (२४ तासात) (रु.) | मासिक पास (५० प्रवासांसाठी) (रु.) | जिल्ह्यात नोंदणीकृत व्यावसायिक वाहने (रु.) |
| कार, जीप, व्हॅन किंवा हलकी मोटर वाहने | ८० | १२० | २७२० | ४० |
| हलकी व्यावसायिक, मालवाहू किंवा मिनी बस | १३० | २०० | ४३९५ | ६५ |
| बस किंवा ट्रक (दोन एक्सल) | २७५ | ४१५ | ९२०५ | १४० |
| तीन एक्सल व्यावसायिक वाहने | ३०० | ४५० | १००४० | १५० |
| जड बांधकाम मशिनरी (HCM) / (EME) (४ ते ६ एक्सल) | ४३५ | ६५० | १४४३५ | २१५ |
| मोठ्या आकाराची वाहने (७ किंवा अधिक एक्सल) | ५२५ | ७९० | १७५७५ | २६५ |
'केवळ रस्तेच नाही, राष्ट्राचे निर्माण सुद्धा' हे घोषवाक्य मिरवणाऱ्या NHAI ने आधी प्रवाशांच्या सुरक्षेचे निर्माण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS