महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विरोधी पक्षाची जबाबदारी शेतकरी संघटनेला पार पाडावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे, गावोगावी संघटना बांधून शेतकरी सुरक्षित करा, असे आवाहन रमेश कदम पाटील यांनी केले.
आज झालेल्या बैठकीत दिगांबर करेवाड, प्रकाश करेवाड, रमेश बळवंतराव हराळे, साहेबराव गणपतराव हराळे, पिराजी तरटवाड, दत्तराव पंडागळे, सदाशिव वाघमारे, मारोती बलपलवाड, विनोद गंगाधर वानखेडे, आत्माराम नारायण वानखेडे, अवधूतराव बळवंतराव हराळे, प्रविण दत्ता हराळे, भगवान विठ्ठलराव हराळे, गुलाबराव माणीकराव हराळे, मुकिंदा नामदेव शिलेवाड, विजय गंगाधर आगलावे, राजु झंकारे
संभाजी सुर्यवंशी, किसनराव करेवाड इत्यादी शेतकरी बांधवांनी बिल्ला लावून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या बैठकीस नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील व निवृत्त अभियंता बळीराम मिराशे उपस्थित होते.
# शेतकरी संघटनेची घोडदौड, कोल्हारी येथे शाखा स्थापन.
# इस्लापूर सर्कल मध्ये राजकीय उलथा-पालथ, कोल्हारी येथे शेतकरी संघटनेची शाखा स्थापन.
# किनवट तालुक्याच्या राजकारणात भुकंप, कोल्हारी येथे शाखा स्थापन.

COMMENTS