नांदेड, (जिमाका) दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्तभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सत्यापण करुन घ्यावे असे कळविले आहे. ज्या शिधापत्रीका धारकांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक अपडेट केले नाहीत. त्या शिधापत्रीकाधारकांना धान्य वाटप करता येणार नाही. अशा शिधापत्रिकाची वगळणी डिलीट करण्यात येणार आहेत. हे लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहणार आहेत. यांची सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रीका धारकांची राहणार आहे. असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा