वडवणी/जगदीश गोरे
बालाघाटच्या डोंगरपट्यातील चारदरी या ठीकाणी जन्मलेल्या फुलचंद (बाबरी) मुंडे यांचा स्वभाव शांत,संयमी मनमिळाऊ सगळ्यांशी प्रेमाने राहुन समोरच्याच मन जिंकणारा माणूस लहानपणा पासुनच भाजपा व स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबावर अलोट सहानुभुती व मनातुन प्रेम करणारा माणुस साहेबांच्या विचाराचे लहानपणीच बाळकडु त्यांना पाहावयास व विचार ऐकवयास मिळून साहेबांच्या विचाराची आकाशवाणी मात्र बाबरी मुंडे यांच्या रक्तात भिणुन हा माणुस साहेबांच्या सानिध्यात गेला बीड जिल्हयातील पाहिल्या फळीतील स्व.मुंडे साहेबांच्या व पंकजाताईच्या विश्वासातील बाबरी मुंडे म्हणुन यांच्याकडे पाहिले जातंय स्व.मुंडे साहेबांच्या सानिध्यात घडलेलं हे रांगडं युवा नेतृत्व म्हणजे बाबरी मुंडे होय. बाबरी मुंडे यांचा राजकीय प्रवास म्हणजे गेल्या पंचवार्षिक वडवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रचाराची धुरा संभाळुन नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात घेऊन पहिल्या नगराध्यक्षपदी आपल्या मातोश्री सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे यांच्या रूपाने पदाचा मान मिळवला आहे व या कार्यकाळात चांगल्याप्रकारे विकास कामे करून वडवणीचा चेहरामोहरा बदलुन जिल्हयामध्ये वडवणी या नगरपंचायतीला नामांकन मिळवून दिले.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही चिखलबीड जिल्हा परिषद गटातुन आपल्या भगिनी अनिता राजाभाऊ मुंडे यांच्या रुपाने निवडुन आणुन सभागृहात पाठवण्याचे काम केले तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणुन स्वाताहा जिम्मेदारी चांगल्या प्रकारे सांभाळताना दिसत आहेत ज्या ज्यावेळी पंकजाताई मुंडे साहेबांनी जिमेदारी दिली त्यावेळेस ती यशस्वीरीत्या पार पाडण्याचे काम हे नेहमी युवा नेतृत्व करत आलेलं आहे.स्व.मुंडे साहेब बीड जिल्हयामध्ये आले असता नेहमीच त्यांच्या अवती भोवती जनतेचा गराडा असे त्यातुनही बाबरी मुंडे साहेबांना दिसले की ते आस्थेवाईकपणे विचारत असत कसा आहेस "बाबरी" या वरूनच मुंडे यांच्यावरील भक्ती लोकांच्या लक्षात येत असे बाबरी मुंडे ही
हे रांगड्या स्वभावाच नेतृत्व जर एखादा सामान्य माणुस यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेला तर त्याला वापस न लावता आपला माणुस म्हणुनच काम करून व चाहा पाजुनच पाठवणारे फुलचंद(बाबरी) मुंडे म्हणुन त्यांची ख्याती आहे कोणत्याही गटातटाला थारा न देता भाजपा व स्व. मुंडे साहेब व पंकजाताई साहेब हेच माझे पक्ष व हेच आमचे दैवत म्हणुन सर्वांशी प्रेमाने राहाणारे बाबरी मुंडे पक्षवाढीसाठी लोकांच्या हितासाठी आणी ताईसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी अहोरात्र झटणारे व शब्द देणे व शब्दाला जागणे हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे म्हणून आम्ही बाबरी शेठकडे आदर्शाचा दिपस्तंभ म्हणून पाहात आलो आहोत. मनापासून विकास करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट,मेहनत,खाव्या लागणाऱ्या खस्ता व धडपड हे गुण बघत आलो आहोत.आजकाल राजकारण्यांच्या नावाने खडे फोडणारे सर्वच असतात. पण, विकासाचा विडा उचललेले युवा नेतृत्व बाबरी मुंडे सारख
कर्तृत्ववान राजकारणात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लोकांचा विश्वास संपादन करुन आपल्या विकासाचा वारू सतत दौडत ठेवणारे बाबरी शेठ मु़डे या रांगड्या समाजाभिमुख नेतृत्वास वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा.

COMMENTS