माजलगाव/भास्कर गिरी
शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पिक कर्ज देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंबा सह, टाळाटाळ करत असून, ना हरकत प्रमाणपत्र शक्तीचे करत असल्याने, शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद,भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी ऑगस्ट महिना संपत आला असला तरी अद्याप दहा टक्के देखील पीक कर्ज वाटप केले नाही. परंतु या बँका शेतकऱ्यांना विनाकारण चकरा मारायला लावत असून संकटात सापडलेला शेतकरी बँकेत फाईल दाखल करून सुद्धा पिकांना खुरपणी,खत, फवारणी पैस्या आभावी करू शकत नसल्याने चांगला पावसाळा असून देखील पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बी-बीयानांच्या कंपन्याकडून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व वयोवृद्ध आज्ञान शेतकऱ्यांना पीक देखील कर्ज वाटप करण्यात यावे.बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.आदी मागण्यांसाठी बीड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे, या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालय, माजलगाव, तहसील कार्यालय केज,तहसील कार्यालय अंबाजोगाई, तहसील कार्यालय धारूर, यांच्यासह सर्व तालुक्यातील अनेक खेड्यात यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या विविध मागण्यांसाठी सहा ऑगस्ट रोजी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनामध्ये कोरणा संकटाचे पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून व कोरणा पार्श्वभूमी वर योग्य ती काळजी घेऊन हे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड,भाई अॅड. नारायण गोले पाटील, भाई अॅड.संग्राम तुपे,भाई भीमराव कुटे,भाई दत्ता प्रभाळे,भाई अशोक रोडे, भाई प्रवीण खोडसे, भाई बाबाराजे गायकवाड, लखन सोळुंके यांच्यासह आदींनी केले
COMMENTS