जागतिक आदिवासी दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी - आफ्रोह संघटना....


-----------------------------------


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.आदिवासी समाज हा देशाचा मूळ भूमिपुत्र आहे.आदिवासी जमाती व संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांचा सन्मान म्हणून 9 ऑगस्ट यादिवशी शासकीय सुट्टी जाहिर करावी.


महाराष्ट्रात सर्व प्रादेशिक विभागात अनेक आदिवासी जमाती आहेत.मराठवाड्यात कोलाम,मनेरवारलू,कोळी महादेव,अंध,गौंड, भिल्ल, ठाकूर,पारधी,या व इतर काही आदिवासी जमाती आहेत.आदिवासी जमात शैक्षणिक प्रगतीकडे,वाटचाल करीत असला तरी त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसा झाला नाही.आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून आदिवासी लोकसंख्या असलेली गावे सुधारण्यासाठी विविध अनेक योजना आहेत.महाराष्ट्रात एकूण ११ टक्के च्या जवळपास आदिवासी लोकसंख्या आहे.परंतु शासनाचे सर्व जमातीकडे सम प्रमाणात लक्ष नाही.क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांनी आदिवासीच्या अस्मितेसाठी इंग्रजांशी लढा दिला व अन्यायाची जाणीव करून दिली.गुजरात राज्याने सुद्धा 9 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे...त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन म्हणून सुट्टी जाहीर करून आदिम जमातीचा व संस्कृतीचा यथोचित सन्मान करावा ही नम्र विनंती...


सदर निवेदन हे आफ्रोह संघटना जिल्हा शाखा नांदेड यांच्यावतीने देण्यात आले...यावेळी सर्व श्री,श्यामसुंदर शिंदे,नागेश लोलापोड,गंगाधर अंदेलवाड, साईनाथ रामोड,माधव लोलापोड,हणमंत माळी, धारबा येलेवाड, संदीप बळवंतकर, किशन अडबलवार, शंकर मुंडलोड,सायलू तोंदुलवार, शंकर मेंगावार व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड यांच्यासह इतर काही सदस्य उपस्थित होते..असे आफ्रोह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल कल्याणपाड यांनी कळविले आहे....


टिप्पण्या