उत्तर प्रदेश मधील ' त्या ' घटनेचा निषेध : माजलगाव राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्री यांना पत्र रवाना !


------------------------------------------------

माजलगाव दि ९ ( प्रतिनिधी )

 श्री.अजयसिंह विष्ट गृहमंत्री , उत्तर प्रदेश महोदय , राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हाच्या वतीने सादर प्रणाम आपणास पत्र लिहिण्यास कारण आहे की आपल्या राज्यातील बदाऊ या जिल्ह्यात एका पन्नास वर्षीय अंगणवाडी सेवीकेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालून तिचा निर्दयी पणे खून केला. तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे ज्या प्रमाणे पत्राची सुरुवात झाली त्या मुळे आपल्या नावा बरोबर 'योगी आदित्यनाथ ' असे नाव न लिहता त्यांच्या खऱ्या नावाचा उल्लेख केला आहे याचे कारण असे की ' योगी ' या शब्दाचा अर्थ ' ज्ञानी ' तपस्वी पुरुष ! परंतु योगी यांनी हे उपनाव त्यांना लावण्याचा अधिकार नाही. याचे कारण असे की, उत्तर प्रदेश मध्ये महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत या मुळे आपले राज्य 'योगी ' राज्य नाही तर ' भोगी ' राज्य झाले आहेत आपली सत्तेत शहरांची नावे बदलण्यामुळे आपल्या राज्यात भीषण परिस्थितीती निर्माण झाली आहे . त्याची की कोणीही कल्पनाच करू शकत नाही . परंतु महाराष्ट्रसारखे सभ्य व सुसंस्कृत नागरिक व एकभरतीय या नात्याने आपणास जागृत करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे .

  त्या साठी हे पत्र पाठवत आहोत याची नोंद असावी -सौ रूमालीताई निलेश चाकणकर , प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी , महाराष्ट्र प्रदेश मुबई .सौ .संगिता तुपसागर , जिल्हाध्यक्षा यांच्या मार्गदर्शना खाली सौ .संध्या शरद भांडेकर , माजलगांव तालका आध्याक्षा , नसरिन शेख माजलगांव यांनी आज येथील पोस्ट ऑफिस मधून हे पत्र पाठवले आहे

टिप्पण्या