आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे बाबत
किसानपुत्र आंदोलनाची भूमिका --अमर हबीब
--------------------------------------------
केंद्र सरकारने शेतकरीविरोधी आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे स्वागत करतो पण हा संपूर्ण कायदा रद्द करायला हवा या मागणीचा आग्रह करीत आहोत.
1) आवश्यक वस्तू कायद्यात दोन हजार वस्तू आहेत. त्यापैकी अनेकांचा शेतकऱ्यांशी संबंध येतो. त्यावर निर्बंध ठेवून फक्त शेतीमाल वगळणे पुरेसे ठरणार नाही. उदा वहान कायद्यात कायम राहिले तर शेतमालाची वहातुक कशी करणार?
2) या कायद्यात बियाणे आहे. त्यामुळेच जी एम बियाण्यांवर सरकार निर्बंध आणू शकते. बियाणे वागळणार की नाही ते स्पष्ट नाही.
3) या कायद्यात समाविष्ट असलेल्या वस्तू वगळणे किंवा समाविष्ट करणे हे नेहमी सुरू असते. आज वागळलेली गोष्ट उद्या समाविष्ट केली जाते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. शेतीमाल वगळला खरा. मग उद्या तो समाविष्ट केला जाणार नाही याची काय हमी?
या सर्व बाबींचा विचार करून किसानपुत्र आंदोलनाने हा संपूर्ण कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.
आवश्यक वस्तू कायद्यामुळे सरकारला बाजारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळतो. म्हणून शेतकऱयांना सर्वात जास्त फटका बसला. या कायद्यामुळे भारतात लायसंस कोटा परमिट राज सुरू झाला. नोकर शाहीचा भ्रष्टयाचार जन्माला आला. या कायद्यामुळे ग्रामीण भागात कारखानदारी निर्माण होऊ शकली नाही. शेतकऱयांना व्हॅल्यू अडिशन चा लाभ मिळाला नाही व किसानपुत्राचे रोजगार मारले गेले. असे अनेक अनर्थ करणारा हा कायदा मुळातूनच रद्द करायला हवा.
●
अमर हबीब
किसानपुत्र आंदोलन
8411909909
#kisanputraandolan
#antifarmerlaws
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणे बाबत किसानपुत्र आंदोलनाची भूमिका -- अमर हबीब -------------------------------------------- केंद्र सरक...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
डॉ. सुधीर रसाळ हे केवळ एक व्यक्तिनाम नसून ही मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील तप्त अशी नाममुद्रा आहे. गेली ४०-४५ वर्षे समीक्षेच्या प्रांतात सुध...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
डॉ. सुधीर रसाळ हे केवळ एक व्यक्तिनाम नसून ही मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील तप्त अशी नाममुद्रा आहे. गेली ४०-४५ वर्षे समीक्षेच्या प्रांतात सुध...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड: :विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित रस्ते वापरण्याची सवय रुजविण्याच्या उद्देशाने नागर्जुना पब्लिक स्कूल, नांदेड ...
COMMENTS