भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी गुजरातमध्ये नुसीतर्फे तिरंगा पदयात्रा*


जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय  निरपराध नागरिकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड  हल्ल्याचा भारतीय सैन्याने " ऑपरेशन सिंदूर "च्या माध्यमातून दहशतवादी अड्डा उध्वस्त करून बदला घेतला.  देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात आपले सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारताचे व आपले रक्षण करीत आहेत. त्यांचा आत्मविश्वास,  मनोधैर्य  वाढविण्यासाठी, त्यांनी युद्धात मिळविलेल्या विजयाचे कौतुक  करण्याकरिता, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या शहिदांना मानवंदना देण्याकरिता नुसीतर्फे २२  मे २०२५  रोजी  गुजरात मधील वलसाड येथे  तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती.

"ऑपरेशन सिंदूर " यशस्वी झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी भारतातील विविध प्रदेशामध्ये तिरंगा यात्रा काढून एक महत्त्वपूर्ण देशव्यापी उपक्रम  राबविला जात आहे. देशभरातील या मोहिमेत देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. या देशभरातील अभिमानास्पद असणाऱ्या राष्ट्रीय चळवळीत भारतातील खलाशांसाठी कार्यरत असणारी नुसी या बलाढ्य कामगार संघटनेतर्फे गुजरातमध्ये वलसाड येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. याप्रसंगी नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ज्या भारतीय सैनिकांनी आपले बलिदान देऊन सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही  नुसी तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालो आहोत. आपले सैनिक केवळ देशाची सीमा सुरक्षित ठेवतात एवढेच नाही,  तर देशांतर्गत प्रत्येकाचा आत्मा सुरक्षित ठेवतात. सिंदूर ऑपरेशन हे असे उदाहरण आहे की,  आपल्या सैनिकांनी निस्वार्थीपणे देशसेवा करून देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. नुसीची ही तिरंगा यात्रा केवळ पदयात्रा नाही, तर हा एक संकल्प आहे. देश हिताच्या संरक्षणासाठी आपले सैनिक लढतात. ही यात्रा प्रत्येक भारतीयांना आठवण करून देते की.   तिरंग्याचा मान ठेवणे ही आपल्या सर्व भारतीय  नागरिकाची जबाबदारी आहे. आपण सर्व मिळून या लढ्यात वीर मरण आलेल्या सर्व शूर सैनिकांना  भावपूर्ण  श्रद्धांजली वाहूया. त्यांच्या आदर्शाच पालन करू. आणि आपला पवित्र तिरंगा नेहमीच उंच फडकत राहील असा संकल्प करूया.

राष्ट्रीय एकात्मतेचे मजबूत प्रदर्शन करण्यासाठी या तिरंगा रॅलीमध्ये खलाशी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा मोठा सहभाग होता. नुसीतर्फे काढलेला हा मोर्चा केवळ नाविकांच्या कल्याणासाठीच नव्हे तर एकात्मतेची  भावना वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय सैनिकांनी केलेल्या बलिदानाचा आदर करण्यासाठी व त्यांना बळकटी देण्यासाठी नुसीचे कामगार व कुटुंबिय या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाले होते. आपल्या राष्ट्रीय तिरंग्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी अभिमानाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. असे आव्हान मिलिंद कांदळगावकर यांनी केले.

सदर तिरंगा रॅली  हॉटेल पाम बीच येथून सुरू झाली आणि स्वामीनारायण मंदिरात रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी भारतीय पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना नाविक कामगारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या