दिव (गणेश माळवे)खेलो इंडिया व दिव दमन दादर नगर हवेली सरकार वतीने आयोजित १ली खेलो इंडिया बिच गेम्स कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला गटात कांस्यपदक विजेता ठरला.
महिला गटात:- उपांत्य फेरीत सामन्यात हिमाचल प्रदेश वि महाराष्ट्र दरम्यान कडवी झुंज देत५१-४१ गुण करत १० गुणांचे महाराष्ट्र संघास हार पत्करून कांस्यपदक पटकावले.
महिला महाराष्ट्र संघाने साखळी सामन्यात छत्तीसगड , दिव दमन ,चा मोठ्या गुणाने पराभव करत उपांत्य फेरीत दाखल झाला.
महिला गटात उत्कृष्ट चढाई पट्टू गार्गी साखरे , हर्षा शेट्टी तसेच उत्कृष्ट डावा व उजवा कोपरारक्षक जुली मिस्कीटा व समृद्धी मोहिते व तेजा सपकाळ व साक्षी सावंत.प्रशिक्षक विद्या शिरस ,
पुरुष गटात उपांत्य फेरीत
हरियाणा वि महाराष्ट्र दरम्यान ५२-२७ गुण करते २५ गुणाने हार पत्कारुन कांस्यपदक पटकावले. साखळी सामन्यात
महाराष्ट्र संघाने विरुद्ध कर्नाटक पुरुष ६२-३५ तर दिव दिमन वि ८२-२५ गुण करत महाराष्ट्र पुरुष संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
पुरुष गटात:-उत्कृष्ट चढाई सौरभ राऊत,साईल पाटील, उजवा कोपरा सुरेश जाधव, अमन शेख, समीर हिरवे, आकाश अरसेसुळ, प्रशिक्षक निलेश कलेबेरे यांचा समावेश होता.
. या यशा बदल महाराष्ट्र राज्य क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य पथक प्रमुख क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे , क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शंकर भास्करे,नेहा साप्ते, अनिता कदम,गणेश माळवे, दर्शन हस्ती, अभिनंदन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा