*२० ऑगस्टला कामगार आयुक्त कार्यालयावर राज्यस्तरीय कंत्राटी कामगारांचा मोर्चा!*




    मुंबई दि.२५:कंत्राटी पद्धत बंद करा,सर्व कंत्राटी कामगारांना २६,००० रुपये किमान वेतन मिळालेच पाहिजे,फोर कोड बिल रद्द करा,सर्वच आस्थापनातील‌ रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात,या मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वांद्रे रेल्वे स्टेशन( पूर्व)  यथून हजारो कंत्राटी कामगारांचा राज्यव्यापी मोर्चा बीकेसी येथील कामगार आयुक्तांच्या कार्यालयावर नेण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती,महाराष्ट्रचे-प्रमुख समन्वयक,सिटूचे‌ नेते डॉ. डी. एल. कराड होते. 

     कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती,महाराष्ट्रच्या वतीने परेल,येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत प्रारंभी महाराष्ट्र इंटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवी वाढदि वसानिमित्त कृती समन्वय समितीच्या वतीने डॉक्टर डि.एल.कराड यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. 

     सिटूचे नेते डॉ.डि.एल.कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला,महाराष्ट्र इंटकच्या वतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई विभागीय अध्यक्ष दिवाकर दळवी तसेच कॉ.एम.ए.पाटील (एआयसीसीटीयू)विकास गुप्ते(एच. एम.एस),सुकुमार दामले (आयटक),विवेक मॉन्टेरो(सीआयटीयू), मिलिंद रानडे(एनटीयूटी)

शुभा शमीम (सीटू), मिलिंद‌ रानडे( एनटीयूटी), उदयभट, विजय कुलकर्णी (एआयसीसीटीयू),संजय सिंघवी(टीयूसीआय), तापती मुखोपाध्याय(बीयूसीटीयू )शिशिर ढवळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. 

     बैठकीत कृती समितीच्या वतीने कामगारांच्या प्रश्नावर छेडण्यात आलेल्या अनेक आंदोलचा उहापोह करण्यात आला,युतीसरकारने कामगारांच्या प्रश्नावर दिलेला नकारात्मक प्रतिसाद आणि त्यातून कामगारांचा वाढता असंतोष,वाढती महागाई आणि बेरोजगारी,नरेंद्र मोदी सरकारने स्वीकारलेल्या कामगार विरोधी धोरणावर वेळोवेळी उचललेल्या लढ्याचा‌ बैठकीत परामर्श घेण्यात आला.

   नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील शहरी भागातील मतांच्या टक्केवारीत फारसा फरक नसल्याची वस्तूस्थिती लक्षात आली आहे.ते एक आव्हान समजून येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त कामगारांपर्यत पोहोचून महायूती विरोधी प्रचारात उतरण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत कृती समितीचे लोकशा ही व संविधान बचाव विषयक आंदोलन प्रभावी ठरले,या बाबत बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.

   २० ऑगस्टचे कंत्राटी कामगारांचे आंदोलन लक्षवेधक ठरावे यासाठी तत्पूर्वी ३ ऑगस्ट रोजी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यस्तरीय परिषद घेण्यात येणार आहे. 

या आंदोलनात सुमारे ४००० वर कंत्राटी कामगारांना उतरविण्याचा या प्रसंगी निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.••••••••••••••

टिप्पण्या