येत्या ८ दिवसांत अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
नांदेड- तरोडा बु. भागातील दिपकनगर येथील रोडवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील रहिवाशांनी सदर अतिक्रमण काढण्यात यावे याकरीता महानगरपालिकेकडे विनंती अर्ज केला होता. त्यावर मनपाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने दि. २६ एप्रिल रोजी पुन्हा अर्ज करुन १ मे महाराष्ट्र दिनी अमरण उपोषण करण्याचा इशारा देताच सहाय्यक आयुक्तांनी एका अर्जाद्वारे सदरील उपोषण तूर्त थांबविण्यात यावे असे कळविले आहे. त्यानुसार दिपकनगर येथील नागरिकांनी सदरील उपोषण तूर्तास थांबविले असून अतिक्रमण न काढल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.तरोडा बु. दिपकनगर येथील गट नं. २६४ मधील दोन व्यक्तींनी रस्त्यावर अतिक्रमण करुन बांधकाम केल्यामुळे समोरच्या भागात वास्तव्यास असणार्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दि. ३ जानेवारी २०२३ रोजी मनपा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन सदर अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. यावर महानगरपालिकेकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याने पुन्हा दि. २६ एप्रिल २०२३ रोजी अर्ज देऊन महाराष्ट्र दिनी अमरण उपोषण करण्याचा इशारा देताच सहाय्यक आयुक्तांनी सदर अतिक्रमण हे नियमाप्रमाणे व कायद्यातील तरतुदीनुसार काढण्याची कार्यवाही करण्यात येईल असे एक लेखी पत्र देऊन उपोषण थांबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार दि. १ मे २०२३ महाराष्ट्र दिनाचे नियोजित उपोषण तूर्तास थांबविण्यात आले असून यावर येत्या ८ दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातील शितल कांबळे, दत्ता पाईकराव, दिपक भगत, संजय लोणे, उत्तम तुळशे, मिलींद साळवे, साहेबराव चौदंते, काशीनाथ खिराडे, बाळू तुळसे यांनी दिला आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा