नायगाव प्रतिनिधी : नायगाव तालुका कृषी विभागाकडे किटकनाशके औषधांचा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना याचा पुरवठा करण्यात आला नाही यामुळे...
नायगाव प्रतिनिधी :
नायगाव तालुका कृषी विभागाकडे किटकनाशके औषधांचा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना याचा पुरवठा करण्यात आला नाही यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे
शेतातील पिकांवर आंळ्या व किटकनाशकांच्या प्रार्दुभावाने पिके नष्ट होत आहेत परंतु नायगाव येथील कृषी च्या गोदामात अनेक प्रकारच्या किटकनाशकांच्या औषधांचा साठा उपलब्ध असून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे शेतकऱ्यांना तो वाटप करण्यात आला नाही नुकतेच कृषी कार्यालयात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यां संदर्भात तहसीलदारांमार्फत पंचनामा करण्यात आला होता यात निम्मे कर्मचारी गैरहजर होते यामुळे सदर पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला यावेळी अनेक प्रकरणेही उघडकीस आले असले तरी अद्याप जिल्हाधिकारी यांच्याकडून पंचनाम्याचा अहवाल येणे बाकी आहे पंचनाम्यास आलेले तलाठी बालाजी राठोड यांच्या समक्ष कृषीच्या गोदामाची पाहणी केली असता सुरक्षा किट,बि-बियाणे,हरभऱ्याचे पोते,शेती औजारे यासह पिकांवर पडणाऱ्या आंळ्यासाठी दर्जेदार उत्पादन असणारी पानसरी नावाची किटकनाशके औषधांचा साठा आढळून आला जेकी शेतकऱ्यांना ते वाटप करणे अपेक्षित होते परंतु येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले नाही यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे

COMMENTS