प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरापासुन जवळच असलेल्या बळसोंड परिसरात पप्पू चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येते मात्र मागिल वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचे मोठे संकट येऊन ठेपल्याने तात्काळ कोरोना महामारीचे संकट दुर करण्याची प्रार्थना पप्पु चव्हाण. मित्र मंडळाच्या वतीने प्रभु रामाच्या चरणी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बळसोंड भागात श्री राम नवमीचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बळसोंड चे सरपंच शैलेश जैस्वाल, उपसरपंच पप्पु चव्हाण, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य अशिष वाजपेयी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रभु रामचंद्राच्या प्रतिमेची उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य महाआरती करण्यात आली. यावेळी भाविक भक्तांनी जगावर आलेले महामारीचे संकट लवकर दुर करून मानवाची या संकटातून तात्काळ सुटका करण्यासाठी प्रभुरामचंद्र चरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमीत घिके, राजेश मोकाटे, बालाजी लाटकर, गजानन कावरखे, कान्होजी थोरात, लक्ष्मण थोरात, विशाल जिरवणकर, शुभम शिंदे, विश्वंभर पटवेकर, दिपक हिरास यांच्या सह पप्पु चव्हाण मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच बळसोंड मधील नागरिकांची उपस्थिती होती.

COMMENTS