2 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियमावली घोषित April 21, 2021 7 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कडक लॉकड...
2 एप्रिलपासून 1 मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध, सरकारकडून नवीन नियमावली घोषित
सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. या नियमांचे उल्लघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.
COMMENTS