आतापर्यंत। अर्धे तरुण होते. पत्रकार जीव देतात. मग आम्हाला बातमी मिळते. लोकशाही जगते. पत्रकारांनाआधी कोरोना लस मिळायला हवी .अशी पत्रकार दिनी...
अर्धे तरुण होते.
पत्रकार जीव देतात.
मग आम्हाला बातमी मिळते.
लोकशाही जगते.
पत्रकारांनाआधी कोरोना लस मिळायला हवी .अशी पत्रकार दिनी मागणी करू या। मी मुख्यमंत्र्यांना व मोदींना मेल करून केली आहे।
आम्ही आमच्या पत्रकारांचा आदर करतो. कौतुक करतो.
कोरोना होऊ नये म्हणून कोरोना व कोरोना लसीची ही ,माहिती वाचा
आज 4 देश कोरोना लस बनवितात।
भारत चीन रशिया व अमेरिका।
आज जगात सर्वात जास्त लसी भारतात बनतात। 200 देश त्यांना वापरतात।याचा आपण आनंद करू या।
आज जगाची लोकसंख्या 780 कोटी आहे. यावर्षी जग सातशे कोटी लसी बनवेल।
भारताने 200 कोटी
डोस ची सोय केलेली आहे।
रामाने रावणाला हरवले।त्याला वानरांची साथ घ्यावी लागली।आपल्याला कोरोनाचा हरवायचे आहे। हे एकाचे काम नाही।त्याला सर्वांची मदत हवी।
त्यासाठी कोरोना शत्रू ची सर्व माहिती सर्व लोकांना हवी। ती आपण सर्वांनी जाणावी। व सर्वाना सर्व भाषेत द्यावी।
सोप्या भाषेत द्यावी। छोटे वाक्य करावे। सोपे शब्द हवे। ते मनोरंजक हवे। चित्रमय हवे । गाणी गोष्टी रुपात सांगावे।
भारतात कोरोना ने एक कोटीच्या वर लोक आजारी झाले। दीड लाखाच्या वर मेले। वर्षभर देश बंद आहे। प्रत्येकासमोर
देशासमोर मोठी आर्थिक समस्या आहे।विकास बंद झाला।
कोरोना आधीच खूप लोक अर्धपोटी राहायचे।आता सर्वांचं काम बंद झाले।
देशाला कोरोनाचे कुलूप लागले आहे. ते उघडायची किल्ली म्हणजे कोरोना लस. ती आपण वापरू या.
सुदैवाने लस येत आहे। ती घेऊया। देश कोरोना मुक्त करू या ।
देशाचे गाडे सुरळीत करू या।
यासाठी कोरोना व कोरोना लसीबद्दल सर्वाना योग्य माहिती देणे हे
सर्वात मोठे देश कर्तव्य आहे।
ते आपण करू।
चालताना ठेच लागते। रस्त्यावर अपघात होतो।। तरी आपण रस्त्याने चालतो।
तशी कोरोना लास घ्यावी. तिने थोडासा त्रास होण्याशी शक्यता आहे। ती पण
खुप कमी आहे।
आपलं सर्व कोरोना विरुद्ध च्या लढाईचे शिपाई। लस घेणे हे आपले काम । लस घेत नाही तो आपले काम नीट करत नाही। लस घेणार नाही तो कोरोनाने आजारी पडेल। सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रांसह। समाजाला आजार देईल। मरेल. हे पाप आपण करू नये.
जुन्याकाळी समुद्रमंथन झाले।
सर्वांनी एकत्र काम।करून अमृत मिळवले।
तसे आत्ता झाले आहे।
सगळं जग एकत्र झाले।
दोनशेच्यावर देशांची सरकारे, दीडशेच्या वर कंपन्या। जागतिक आरोग्य संघटना।हजारो शास्त्रज्ञ डॉक्टर परिचारिका 24 तास एकत्र काम करीत आहे आणि म्हणून ही लस बनली ।
हे लस नावाचे अमृत घेतले की कोरोनाने मरण नाही।कोरोनाचा आजार नाही।
हे अमृत घेतील ते भाग्यवान।
जे घेणार नाही त्यांना कोरोनाने मरणाची भीती आहे.
मोठया लोकांनी टीव्ही समोर लस घेतली आहे ।
हरयाणाचे आरोग्य मंत्री यांनी कोरोना लस घेतली।
अनेक देश प्रमुखांनी लस घेतली आहे। अमेरिकेच्या उपराष्ट्रपती ने घेतली आहे। आता निवडून आले ते राष्ट्रपती बिडेन व उपराष्ट्रपती कमला हॅरीस ने लस घेतली आहे त्या भारतीय वंशाच्या त्यांनी घेतली आहे।
इझ्राएल चे पंतप्रधान नेत्या नातू यांनी घेतली आहे।
त्यांनी ज्यादा पैसे देऊन ला मिळवली व 24 तास सर्वाना लस देत आहेत।
आपल्याकडे पण 24 तास लसीकरण करावे।
आपल्या घरातील आजी-आजोबांना सर्वात पहिले लस द्या।
भारतात 70 लाख डॉक्टर व परिचारिकांनी लस घेण्यासाठी नावं नोंदवली आहेत। लस घेतली की आपण कामे करायला मोकळे.
जगभर 60 वर्षे वयाच्या वरच्या लोकांना जास्त धोका आहे। पण भारतात निम्मे मृत्यू हे 40 ते 60 वर्षे वयातील लोकांचे झाले ।
त्यामुळे आपल्याकडे 40 वर्षा वरील लोकांना जीवाचा धोका जास्त आहे।
सरकार 50 च्या वरच्या लोकांना लस आधी देणार आहे।
जेंव्हा मिळेल तेंव्हा चाळीस वर्षे सर्वांनी लस घ्यावी।
जगात सर्वात जास्त मधुमेही भारतात आहेत. भारत मधुमेह व , उच्च रक्त दाब यात जगात नंबर 1 आहे।
ज्यांना मधुमेह दमा आणि ऍलर्जी कुठलाही आजार येताना शक्यता जास्त आहे त्यांनी स्वतःला जास्त जपावे ।पोट सुटलेल्या लोकांचे वजन जास्त असते। एक किलो वजन वाढलं की रक्तदाब 2 मिलिमीटर ने वाढतो। आणि रक्तातील साखर वाढते।
पोट दिसते त्याचा रक्तदाब व साखर जास्त आहे हे जाणा ।ते डोळ्यात दिसते . तपासणीची गरज नाही.
त्यांना आयुष्य कमी। कोरोना ने मरायचं धोका जास्त। ते
कमी करायचे हे मी शेवटी सांगणार आहे.
आजार पसरू नये म्हणून कोरोनात सर्व देशांनी ताळेबंदी केली।
ती स्वीडन ने केली नाही।
आज तेथे खूप कोरोना आहे। मरण खूप आहे।
असेच अमेरिकेचे।
अमेरिकेची लोकसंख्या आपल्या पाव पट। मृत्यू आपल्या पेक्षा 3 पटीने जास्त। म्हणजे 12 पटीने जास्त
आता आपल्याला कळेल की
भारताने चांगली कामगिरी केली।आपण दोन महिना देश बंद केला।
या दोन महिन्यांमध्ये आपण, सर्व देश शिकला. डॉक्टर सरकार व समाज शिकला कि कोरोनाचा तोंड कसे द्यायचे।
कोरोना सर्वाधिक घरात पसरतो एकला झाला कि मग तो सर्वांना होता।
असे व्हायचं नसेल तर काही गोष्टी करा।
1 सर्व खिडक्या दरवाजे पूर्ण उघडे ठेवा। घरात शुद्ध हवा मोकळी खेळू द्या।
समजा मी घरात कोरोना आणला।
माझ्या नाकातून बाहेर येणाऱ्या हवेत त्याचे विषाणू आहेत।
ते खेळत्या हवे सोबत बाहेर जातील। माझ्या घरच्या लोकांना आजार होणार नाही ।
जमले तर एगझोस्ट पंखा लावा। तो घरातील हवा बाहेर टाकतो।
२] जागा असेल तर आजी आजोबांना अलग खोली द्या। त्यांच्यासाठी अलग सु शि घर असेल तर उत्तम।
मुले आजार पसरवतात।
नातवांना आजीआजोबांपासून खाडे दिवस दूर रहायला सांगा।
घरी पण नेहमी सर्व नाकाला फडके बांधा ।
३] वारंवार हात धुवा।
पाण्यापाशी असले की हात धुवा। साबणाने धुवा। 1 मिनिट धुवा।
महत्त्वाचा मुद्दा बाहेरून आले की १ मिनिट हात धुवा हात धुवा.
एक मिनिट कसा मोजायचा ? १] तेथे घड्याळ लावा। २] हात धुताना
जनगणमन म्हणा। त्याला 1 मिनीट लागतो।३] किंवा आपल्या आवडीचे 1 गाणे घड्याळा समोर म्हणा। 1 मिनिटात जेवढे होईल तेवढे दर वेळी म्हणा। ४] एखादे सुभाषित म्हणा। रोज नवे। ते पाठ होईल।
४] घराबाहेर सर्वापासून २ हात दूर रहा. मोकळ्या हवेत काम करा. गर्दी टाळा.
आता लसी बद्दल
प्रश्न : लस कशी बनते?
लस सहज बाजारात येत नाही।
ती सुरक्षित आहे का? परिणाम कारक आहे का याचा अभ्यास होतो।आधी प्राण्यांवर। मग थोड्या लोकांवर। मग जास्त लोकांवर। मगच ती बाजारात येते।
लस कशी बनते।
आपल्याला जेव्हा आजार होतो तेव्हा शरीरामध्ये आजार करणारे जंतु मारणारी ताकत बनते। प्रतिकारशक्ती बनते।
मेलेले जंतू आजार करत नाहीत।मेलेले जंतू शरीरात टोचले तर प्रतिकार शक्ती बनते। भारत बायोटेक अशी लस बनवीत आहे। तिचे नाव कोव्हॅक्सीन।
ब्राझील ने हिच्या 5 लाख डोस ची मागणी केली आहे।
कोरोना विषाणू चे बाहेरचे आवरण असते।त्याविरुद्ध आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती बनते।ते आवरण सिरम च्या लसीतआहे।ते शास्त्रज्ञांनी अलग केले। आपल्याला आजार न करणाऱ्या विषाणूंच्या मदतीने त्यांना वाढवले। ही दुसरी लस।
ही आपली लस इंग्लंड मध्ये देणे सुरू आहे।
आता तिसऱ्या लसी बद्दल।
हे कोरोनाचा बाहेर चे आवरण बनवा असे सांगणारे जनुक असतात। ते शास्त्रज्ञांनी अलग केले। वाढवले। ते तिसऱ्या लसीत आहे।त्यांना एमआरएनए म्हणतात. ही लस झायडस ही भारतातील कंपनी बनविते।फायझर व मॉडर्ना हीच बनवितात।
सर्व लसी चांगल्या आहेत.
लोक जास्त । लसी कमी। जी मिळेल ती घ्या।
आपली कोरोना सह लढाई चालू आहे। एका दिलाने सर्वांनी काम करावे।
आपण आपल्या सेनापतीचे ऐकावे।
म्हणजे शास्त्रज्ञ, डॉक्टर, पंतप्रधान सांगतात ते ऐकावे। ते म्हणतात की सर्वांनी लसी घ्या ।आपण घ्याव्या। सर्वाना सांगावे।
सर्वाना सांगावे की ही लढाई आहे। अफवा पसरवू नका। चुकीच्या गोष्टी मांडू नका।तज्ञांवर विश्वास ठेवा.
जगभर एक कोटी लोकांनी लस घेतली आहे. अमेरिकेत वीस लाख लोकांनी लस घेतली आहे।
ही स्वातंत्र्यानंतरची आपली सर्वात मोठी लढाई आहे. आजपर्यंत च्या सर्व लढायात आपली 11 हजार माणसे मेलीत। कोरोनाने एका वर्षी दीड लाख लोक मारले १ कोटीच्यावर लोक आजारी आणि खराब केले। सर्वांना घरी बसवले. उद्योगधंदे बंद झाले। सर्वांची कमाई बंद झाली। देश भिकेला लागला। हे बदलायचा एकच रस्ता आहे। सर्वांनी लस घेणे। ही माहिती सर्वाना सर्व भाषेत देणे।
आपण ठरवा की लस घ्यायची की कोरोना होऊ द्यायचा।
भारतात 1 कोटी लोकांना कोरोना झाला। दीड लाख लोक मेले।
आज जगात 1 कोटी लोकांनी कोरोना लस घेतली। त्यातील एकही नाही मेला। 6 लोकांना त्रास झाला। पण सर्व बरे झाले।
प्रश्न : लसिनी काय त्रास होतो?
त्याचा इलाज काय आहे?
उत्तर :
सर्वांनी आयुष्यभर अनेक सुया घेतल्या. सर्वांपेक्षा या कोरोनाचा सुई ने कमी कमी त्रास होतो।
आपण सर्वांनी जखम झाल्यावर धनुर्वाताची लस घेतली।तिच्या पेक्षा कमी त्रास कोरोनाचा सुई ने होतो।
सुई घेणे असे सुखाचे करा।
लोकांना भीतीने सर्वाधिक त्रास होतो।
या माहितीने त्यांची भीती जाईल.
नवीन सुया खूप छान आहेत।
डास चावतो तेंव्हा जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास कोरोनाचा सुईने होतो।
सुई देणारीला सांगा की तिने सुईतून हळू औषध अंगात ढकलले तर अजिबात कळत नाही। तसे करायला सांगा।
उपाशीपोटी जास्त दुखते. खाऊन पिऊन जा. सोबत बिस्किटे पाणी घेऊन जा । 3 बिस्किटे खा 2 पेले पाणी प्या। मग सुई घ्या।
सर्वाना बिस्किट पाणी द्या असे आम्ही आमच्या महानगरपालिकेला सुचवले आहे ।आपण पण सरकारला सांगा।
बसुन सुई घ्या।
काही लोकांना दुखले, जखम झाली किंवा सुई घेतली तर चक्कर येते.
ते आडवे झाले, झोपले की बरे होतात. झोपल्याने मेंदूचा रक्त पुरवठा वाढतो व त्यांना बरे वाटते।
म्हणून सुई घेऊन खराब वाटले तर तसे मोठ्याने ओरडून सर्वाना सांगा। आडवे व्हा। जमिनीवर वा टेबल खुर्ची बेड वर। सोबत 1 लिटर पाणी न्या. पाणी प्या। ते संपवा। बरे वाटेल।
लाखात एखाद्याचे शरीर विचित्र प्रतिसाद देते।
त्याला सुई घेतल्यावर चक्कर येते। त्याचा रक्तदाब घटतो।
याला एना -फाय- लॅक्सीस असे म्हणतात।
ते ऍड-रीना-लिन या सुईने बरे होतात.रोगी 1 लिटर पाणी दिले की तो बरा होतो। आपण पाणी प्यावे। डॉक्टरनी 2 मोठ्या सुई लावून 2 सलाईन जलद लावावे।म्हणजे पाणी द्यावे.
ए ना -फाय- लकसिस ही आणि बाणी असते। तिच्या इलाजाच्या 3 पायऱ्या आहेत। त्यांना आम्ही एसीबी असे म्हणतो.
१ ए म्हणजे ओरडा : धावा असे ओरडा। शिटी वाजवा। सर्व मदतीला येतील।
२.ए म्हणजे आडवा करा
सुई घेतलेल्याला आडवा करा। झोपवा। त्याचे पाय एकाने उंच आकाशाकडे धरावे । याने पायातील रक्त मेंदूकडे जाईल। रोग्याला बरे वाटेल।3। ए म्हणजे ऍड-रीना-लिन
त्याला ऍड-रीना-लिन ची सुई द्या। 1 लिटर पाणी दिले की तो बरा होतो। आपण पाणी प्यावे। डॉक्टरनी 2 मोठ्या सुई लावून 2 सलाईन जलद लावावे।
सी म्हणजे सलाईन लावा।
बी म्हणजे ब्रेथ म्हणजे श्वास। श्वासाला तास होतो। असेल तर त्याला प्राण वायू द्या। घशात पाणी जमा झाले असेल तर ते काढा।
बी म्हणजे ब्लड प्रेशर। रक्तदाब। तो घटतो। तो मोजा।
हे एसीबी प्रत्येकाला कळले व वळले तर कुणीही कोरोनाने व लसीच्या त्रासाने मरणार नाही।
मागे जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा सरकारने सर्वांना लस दिली. पारशी लोकांनी ती घेतली। त्यांना प्लेग झाला नाही। ते आजारी झाले नाही। ते मेले नाही।
आपल्या लोकांनी लस घेतली नाही। ते म्हणाले की आम्ही शाकाहारी। ही लस जनावरांत बनवली आहे।
यामुळे आपले खूप लोक आजारी पडले। 1 कोटी लोक मेले। यापासुन शिकू। ही चूक करू नका असे सर्वाना सांगू या।
आपले शरीर रक्षण करणे हाच आपला पहिला धर्म आहे। वाचलो तर बाकी धर्म पाळू।
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीराच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आपले पाहिले काम आहे। असे उपनिषद म्हणतात।
अकाल मृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम
असे आपण पूजेत म्हणतो।असा मी नवा श्लोक केला आहे.
अकाल मृत्यु हरणं कोरोना व्याधि विनाशनम।कोरोना लस धारम्यामहं । कोरोना आजार व मरण टाळायला मी कोरोना लस घेत आहे. जय हिंद. डॉक्टर हेमंत जोशी ९८२३२८१४४७e; haj2007@gmail.com

COMMENTS