*आर्थिक विकास हा शाश्वत असावा-डॉ. डी.बी.रोडे

 


नांदेड:( दि.६ ऑक्टोबर २०२४)

           मानवाने विकास प्रक्रिया राबवत असताना नैसर्गिक घटकांचा विचार केला नाही; त्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. दारिद्र्य, आरोग्य, राहणीमान, कुपोषण, भूकबळी इ.निर्माण झालेल्या समस्या या आपण राबविलेल्या चुकीचा आर्थिक विकास प्रक्रियामुळे  झाल्या आहेत. शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. पर्यायी साधने शोधणे, साधनांचा पुनर्वापर करणे, पुनर्निर्मिती करणे, टाकाऊ पदार्थ कमी करणे हे महत्त्वाचे बदल करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे; असे मत शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.बी. रोडे यांनी व्यक्त केले. 

           स्वामी रामानंद एक मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार यशवंत महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळ  २०२४-२५' च्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

               अर्थशास्त्र  विभागामार्फत निर्मित 'अर्थनीती' उपक्रमांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी गायत्री सोळंकीने तयार केलेल्या 'शाश्वत विकास ध्येये' आणि किरण गादेवार हिने तयार केलेल्या 'मृदा संवर्धन' या भित्तीपत्रकांचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. 

           कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे होते.

             प्रारंभी प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.आर.मुठ्ठे यांनी केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.डी.आवाळे यांनी केले. अभ्यास मंडळाचे संयोजक डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड होते. 

           याप्रसंगी डॉ.डी.डी.भोसले, प्रा. नयना देशमुख, प्रा.राहुल लिंगमपल्ले, डॉ. संतोष पाटील. प्रा.योगिता पवार तसेच पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या