नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
डोळे हे मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी असली तरी आघाताने किंवा आपघातामुळे ही देणगी सर्वांना मिळत नाही . आघात किंवा आपघातामुळे दृष्टीहीन झालेल्यांना पुन्हा दृष्टी मिळण्याची किमया विज्ञानाने केली आहे . परंतु यासाठी गरज आहे . ती नेत्रदान करण्यासाठी पुढे येण्याची . या पवित्र कार्यासाठी हिंगोली येथील प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील यांनी पुढाकार घेत सपत्नीक नेत्रदानाचा संपकल्प केला . त्यांचा हा संकल्प अनेकांच्या विचारांना प्रकाश ठरला असून आत्तापर्यंत नांदेड जिल्ह्यात नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झीरो होती . परंतु केवळ पाच ते सहा दिवसात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांची संख्या ४८५ वर पोहचली आहे . रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेला हा संकल्प चळवळीचे स्वरुप प्राप्त करत असल्याचे दिसून येत आहे . प्रशासकीय अधिकारी असतांनाही केवळ ' बोलबच्चन ' नव्हे तर कृती करणाऱ्यापैकी एक असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी दि . २८ सप्टेंबर रोजी दिव्यांगासाठी कार्यरत असलेल्या ' सक्षम ' या संघटनच्या माध्यमातून स्वतः आणि पत्नी वर्षा पाटील यांच्या नेत्रदानाचा संकल्प करत नोंदणी केली . रामदास पाटील सुमठाणकर यांनी नेत्रदानाची नोंदणी करुन सोशल मिडीयावर ' आपल्या मृत्युनंतर सुद्धा एखादा आपल्या डोळ्याने जग बघु शकेल तर मागे राहू नका , नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही सुंदर जग पहा ' असे भावनिक आवाहन केल्यानंतर त्यांच्या चाहत्या वर्गाने देखील नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे . ' सक्षम'च्या संकेतस्थळावर दि . २८ सप्टेंबर पुर्वी नांदेड जिल्ह्यातील नेत्रदान नोंदणी झीरो होती . परंतु आजघडीला ती ४८५ वर पोहचली आहे . रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेल्या नेत्रदान संकल्पाला नेत्रदान चेळवळीचे स्वरुप आले असल्याचे दिसून येत आहे . एखाद्या अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमय करण्यासारखे कुठलेही कार्य नव्हे जगात नेत्रदान हे एकमेव असे पुण्यकर्म आहे ' मरावे परी नेत्ररुपी उरावे ' या भावनेने रामदास पाटील सुमठाणकर यांनी केलेला हा नेत्रदानाचा संकल्प अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे
COMMENTS