आदरणीय प्रधानमंत्री,
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे, कोरोना महामारीत सर्वजण घरात लॉक डाऊन असताना शेतकरी मात्र शेतात राबत होता. या काळात शेतकऱ्यांनी शेतीवर प्रचंड मेहनत घेतली. पेरणीसाठी पैसे नसतानाही उसने पैसे घेऊन पेरणी केली,बियानालाच पैसे नाहीत तेंव्हा पीक विमा कुठून भरणार.शेतकऱ्यांची प्रचंड मेहनत बघून धरणी माय ही प्रसन्न झाली. पीकही जोमदार शेतात डोलू लागली,पण अतिवृष्टी ने घात केला. डोळ्या देखत पीक हातून गेली,निसर्ग कोपला आता शेतकऱ्यांना आधार फक्त सरकारचा.
आम्हा शेतकऱ्यांच्या मनाच्या सिंहासनावर आम्ही आपणास राजा म्हणून विराजमान केले आहे,केवळ त्यामुळेच हे प्रचंड बहुमत आपणास मिळाले आहे. मनाच्या सिंहासनावर विराजमान राज्यास आज शेतकरी आर्थिक संकटात असताना "राजाने राजधर्म पाळावा" अशी विनंती करत आहे. शेतकरी शेतात विपरीत परिस्थितीशी लढून आज देशाची भूक भागवत आहे,आज सरकारची सकारात्मक भूमिकाच शेतकऱ्यांना आधार देऊ शकते.आज आमच्या मनावर राज्य करणारा राजा जर प्रामाणिक असेल तर कुठल्याही आडकाठी शिवाय शेतकऱ्यांना पूर्ण मदत करेल. नाहीतर आम्ही अस समजू की फक्त निवडणूक जिंकण्यासाठीच आमच्या मनाशी खेळलेलं षडयंत्र होत.
माननीय प्रधानमंत्री आपला राजधर्म पाळतील ही अपेक्षा.
श्री दिपक मोरताळे
सामाजिक कार्यकर्ता,नांदेड,महाराष्ट्र.
COMMENTS