*नागपूर दि.१०: "हरिभाऊ नाईक स्मृती समाजसेवा प्रतिष्ठान" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची कार्यवाही नुकतीच त्यांच्या स्मृती दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर यांच्या संकल्पनेतून सहा महिन्यांपूर्वी या प्रतिष्ठानची स्थापना झाली.*
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे दिवंगत अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांचा प्रथम स्मृतिदिन नुकताच नागपूर येथे संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख म्हणून बोलताना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे विद्यमान अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिन अहिर हरिभाऊ नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन करताना म्हणाले, हरिभाऊ नाईक यांनी गांधी तत्वप्रणाली प्रत्यक्ष कृतीने जोपासली,कामगारांच्या प्रश्ना वर त्यांनी कधीही टोकाची भूमिका घेतली नाही.प्रथय वाटाघाटी, त्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि शेवटी रस्त्यावर उतरून उपोषण, निदर्शनाच्या मार्गाने कामगारांना न्याय मिळवून दिला.सचिन अहिर असही म्हणाले, आज ज्यांच्या मुळे उद्योगात कंत्राटी पध्दती, फोफावली,तेच कंत्राटदार कामगार चळवळीचे नेते होऊ लागले आहेत, ही गोष्ट हरिभाऊ नाईक यांच्या विचारांपासून फारकत घेणारी आहे.
कार्यक्रमात माजीमंत्री विलास मुत्तेमवार,सतीश चतुर्वेदी, एस.क्यू. झामा,स्वातंत्र्यसैनिक निलाताई चितळे यांनी आपल्या भाषणात, हरिभाऊ नाईक यांनी मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात केलेले पारदर्शक काम,आंतरराष्ट्रीर कामगार संघटनेत मांडलेले कामगारांचे अभ्यासपूर्ण प्रश्न,इंटक मध्ये बजावलेली रास्त भूमिका, मुबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेले परिश्रम या सर्वच कामांना उजाळा दिला.प्रास्ताविक संजय हरिभाऊ नाईक यांनी केले.या प्रसंगी हरिभाऊ नाईक समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपस्थित रत्नाकर चेडगे उपस्थित होते.
या औचित्याने हरिभाऊ नाईक स्मृती समाजसेवा प्रतिष्ठानची रितसर घोषणा करून, शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.•••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा