केज ! प्रतिनिधी
*केज तालुक्यात 2017 -2018 पासून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या वयक्तीक लाभाच्या शेतकर्यांना मिळणार्या 500 पेक्षा जास्त जलसिंचन विहिरींचे प्रस्ताव लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धूळखात पडले आसून आ.नमिताताई मुंदडा तुम्ही तरी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.*
*गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केज तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी प्रस्तावित करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या जलसिंचन विहिरीचे प्रस्ताव धूळखात पडले असून केज तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाही त्यातच प्रशासनाकडून देखिल याकडे गांभीर्यपूर्वक बघितले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.*
*दरम्यान दररोज कोणत्याही प्रश्नावर आक्रमक असणारे सत्ताधारी,विरोधक व लोकप्रतिनिधी शेतकर्यांच्या वयक्तीक जलसिंचन विहीरीच्या प्रश्नावर आक्रमक होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आसून आत्ता तरी लोकप्रतिनिधी लक्ष घालून शेतकर्यांच्या जलसिंचन विहिरींचा प्रश्न मार्गी लागतील का..? हे पाहावे लागणार आहे.*
*आ.नमिताताई तुम्ही तरी लक्ष घाला
केज मतदार संघातील शेतकऱ्यांचे जलसिंचन विहिरीचे प्रस्ताव मागील वर्षांपासून धूळखात पडले आहेत.दरम्यान आ.नमिताताई तुम्ही तरी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भावना शेतकऱ्यांकडून होत आहे.
COMMENTS