*सायंस कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न*


नांदेड महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.डी तु गवई हे उपस्थित होते. कार्यक्रमात वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना प्रा. रैनी राजेश्वर राव हे म्हणाले निश्चित व्हा संघर्ष करा व संघटित व्हा हे तत्त्व डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केले ते प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात बाळगावे. 1951 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे 2011 मध्ये पुनर्प्रकाशन झाले ते पुस्तक बुद्धा आणि धम्म क्रिटिकल एडिशन हे होते. वक्ता म्हणून प्रा. तुकाराम बोईवाड यांनी असे विचार व्यक्त केले की व्यक्तीने न्याय समता बंधुता या तत्त्वावर आधारित राहून जीवन जगले पाहिजे असे बाबासाहेबांचे विचार होते, त्याचबरोबर सुंदर असे डॉ. बाबासाहेबांवर त्यांनी गीत प्रस्तुत केले. वक्ता म्हणून बोलतांना प्रो. डॉ. डी आर मुंडे म्हणाले महामानव, क्रांतीसुर्य, भारतरत्न या नावाने डॉ. बाबासाहेब ओळखले गेले पण त्यांचे आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. वक्ता म्हणून बोलतांना उपप्राचार्य प्रा.ई एम खिल्लारे म्हणाले समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी न्याय व्यवस्था व कायदे निर्माण केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयात करावी असे जी आर आज आले आहे, वक्ते म्हणून पर्यवेक्षक प्रा. एम आर मुळे म्हणाले औरंगाबाद येथे निर्माण केलेले मिलिंद कॉलेज व त्या मिलिंद कॉलेजच्या जुन्या आठवणीं या गोष्टींना उजाळा देत  त्याच्या माहितीचे विवरण केले. वक्ता म्हणून बोलतांना प्रो. डॉ. ए एस बनसोडे यांनी मुंबईमध्ये आज सुद्धा सामाजिक बहिष्कारण प्रतीक्षात घडत आहे याचे एक उदाहरण स्पष्ट केले ते घडले नाही पाहिजे सर्वांनी बाबासाहेबांचे व त्यांच्या विचारांचे अवलोकन केले पाहिजे असे आपल्या भाषणात म्हणाले.अध्यक्षिय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ डी यु गवई यांनी विचार व्यक्त करताना देशात नाही तर प्रदेशात जाऊन अनुकूल परिस्थिती नसताना शिक्षण बाबासाहेबांनी प्राप्त केले समाज घडविण्यासाठी कष्टात जीवन घालवले समाज परिवर्तन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजिका   उपप्राचार्य, स्टाफ सेक्रेटरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ.अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व व त्यांचे सामाजिक कार्य यावर माहिती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना करून सूत्र संचालनाचे कार्य हाती घेतले. तसेच प्रा. एस एफ गोरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रो. डॉ. बी डी गचांडे, डॉ. के सी शेंडे, डॉ. व्ही आर मराठे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. आर ए मुनेश्वर, डॉ. पी एस सुतकर, प्रा. रंजन राठोड, डॉ. संदीपान वनवे, प्रा. डी के इंगोले, श्री बबन फुले, डॉ. एम एम देशमुख, श्री व्ही व्ही खंदारे, रजिस्ट्रार श्री गौतम वाघमारे, इत्यादी कार्यक्रमात उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व त्यांची जयंती साजरी केली. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी श्री शंकर पतंगे, श्री दिलीप कापुरे, श्री पांडुरंग कदम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या