मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. गृहम...
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)
*गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे*
---------
*अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे*
मुंबई दि 5: गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. श्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे

COMMENTS