आज लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष म्हणजे दलित, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या दुःखाला ते स्वतःचे दुःख मानत. त्यामुळे आपल्या खणखणीत शाहिरीद्वारे त्यांनी सर्व जनतेचे दुःख जनतेसमोर अगदी परखडपणे मांडलेले दिसते. महाराष्ट्र मध्ये १९४९ ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उदयास आली. या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख या तिघांचाही सहभाग होता. शेतकऱ्यांच्या अन्याय अत्याचाराला या तिघांनी वाचा फोडली ती 'लाल बावटा' या कलापथकाद्वारे... खरंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व त्यांचे सहकारी श्रमिक कामगार म्हणून राबत होते, त्यांनीही दुःख भोगले होते. त्या दुःखाची जखम त्यांच्या अंतर्मनाला भिडली होती. त्यांचे अंतर्मन तळमळत होते. आणि तळमळलेल्या त्यांच्या अंतर्मनाने वैचारिक लढा उभा केला. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी स्थापन केलेल्या कलापथकाद्वारे ते विविध कार्यक्रम सादर करीत असत. ठाणे जिल्ह्यातील
"शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे"
addComments
टिप्पणी पोस्ट करा