अवघ्या सात दिवसाच्या नवजात अभ्रकाचा हाताची सुई काढ़ताना चक्क अंगठा कापला गेला.

कंधार प्रतिनिधी कंधार शहरातील सिध्दार्थ नगर भागात डॉक्टर दापत्यांचे नावाजलेले हॉस्पिटल आहे. एक स्त्री रोग तज्ञ तर दुसऱ्या बालरोगतज्ञ आहे. सदरील दवाखान्यात महिला प्रसूती झाल्या नंतर तिच्या नवजात बाळाला  सुट्टी देण्यात आली असता च्या बालाच्या डाव्या हाताला सुई लावण्यात आली होती. ती काढताना येथिल कर्मचारी यानी या नवजात अभ्रकचा चक्क अंगठाच कापण्यात आला. यामुळे दवाखाना परिसरामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईका मदे हळहळ व्यक्त करण्यात येत होती.  घडलेला प्रकार असा की तालुक्यातील उमरज येथील आकाश भुत्ते हे आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी काही दिवसांपूर्वी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसुति झाली आणि मुलगा झाला. अन्न भुत्ते कुटुंबाला आनंद गगनात मावेनासी झाला. या बालाला सातव्या दिवशी त्यांना सुट्टी देण्यात आली. बाळाच्या हाताला सुई लावण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने २३ रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान पट्टी काढायला जाऊन चक्क डाव्या हाताचा अंगठाच कापला. यामुळे दवाखान्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्याच दिवशी संध्याकाळी बाळाला नांदेड येथे हलविण्यात आले. २४ रोजी बाळाचे वडील आणि त्यांचे नातेवाईक याबाबतची विचारणा करण्यासाठी दवाखान्यात आले. यावेळी दवाखान्यात गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. काही जेष्ठ नागरिक व पोलिसांच्या मदतीने यावर तोडगा काढण्यात आला. चुकीमुळे जी गोष्ट घडून गेली ती वापस तर येणारं नाही म्हणुन पुढील खर्चासाठी लागणारी जी मदत आहे ती डॉक्टरांनी द्यावी. असा तोडगा काढून प्रकरण मिटविण्यात आले. 


*कंधार शहरातील काही खाजगी दवाखाना सेवा देण्यात तत्पर आहेत. तर काही नावालाच प्रतिष्ठित असल्याची दिसून येत आहे. अनेक खाजगी दवाखान्यात स्टॉप चक्क बारावी पास तर कुठे बारावी नापास असल्याचे बोलले जात आहे. अशा स्टाफमुळे असे प्रकरण समोर येत आहेत. एका निष्पाप सात दिवसाच्या बाळाला आपला अंगठा गमावा लागला. याला याला जबाबदार डॉक्टर की तेथील कर्मचारी अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

* काही खाजगी डॉक्टर रात्री आठच्या नंतर पेशंट घेत नाहीत. दवाखान्यांमध्ये उपलब्ध असून सुद्धा चक्क बाहेरगावी गेले असे सांगतात. या फोन घेत नाहीत अशावेळी खेडेगावातून रात्री बेरात्री आलेल्या रुग्णांनी जावे कुठे? ज्या डॉक्टरच्या भरोशावर १० ते १५ किलोमीटर अंतरावर येतो मात्र त्या ठिकाणी त्याचा भ्रमनिराश होत आहे. यावर कोणत्याही अधिकाऱ्याची वचक नसल्याचे बोलले जात आहे. सध्या खाजगी दवाखान्यामध्ये मलेरिया, टायफाईड, तापीचे, डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. रात्री बे रात्री रुग्ण आले तर चक डॉक्टर नाही असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे रुग्णांवर नांदेडला जाण्याची वेळ येत आहे.
टिप्पण्या