राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी काय सांगितलं?

थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी . जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत.

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद

दत्तु नावाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलात आला हे वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवायत करून संघातील मुलांची शरीरे दणकट होतील. परंतु शरीरातील मने विषारी होत आहेत. आपल्या संघटनेतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊ देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे! दुनियेतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दीच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत.

आपल्या हिंदुधर्मात गायत्री मंत्राला आपण अत्यंत पवित्र मानले आहे. का बरे? वेदांत शेकडो मंत्र आहेत. परंतु ह्याच मंत्राला आपण प्राधान्य का दिले? कारण या मंत्रात स्वतंत्र विचारांची देणगी मागितली आहे. सूर्याजवळ प्रार्थना केली आहे की, ‘हे सूर्या, जसा तुझा प्रकाश स्वच्छ आहे, तशी आमची बुद्धी सतेज राहो. आमच्या बुद्धीला चालना दे.

‘गायीगुरे, धनसंपत्ति, संतति वगैरेंची मागणी करणारे वेदामध्ये शेंकडो मंत्र आहेत, परंतु बुध्दिची मागणी करणारा मंत्र आपण पवित्र मानला. ती बुध्दीच आज मारली जात आहे. एका ठराविक साचाचे अहंकारी विषारी खाद्य अशा संघटनांतून दिले जात आहे. या संघटनाचे पुरस्कर्ते आपापल्या संघटनांभोवती भिंती बांधीत आहेत. बाहेरच्या विचारांची त्यांना भीती वाटते. परंतु बाहेरचे विचार आल्याशिवाय राहणार नाहीत. विचारांना कोण अडथळा करणार?

संघटनेला शास्त्रीय विचार हवा

हिमालयाची उंच शिखरे ओलांडून ते विचार धावत येतील. सप्तसागर ओलांडून ते विचार येतील. तुमच्या भिंती कोलमडून पडतील. नवविचारांची ज्यांना भीती वाटते, त्यांचे तत्वज्ञान कुचकामी आहे. बायबलमध्ये एक वाक्य आहे, ‘तुझे घर खडकावर बांध म्हणजे ते वादळात पडणार नाही, पावसात वाहून जाणार नाही.’ त्याप्रमाणे आपल्या संघटना शास्त्रीय विचारांच्या पायावर उभारल्या पाहिजेत. परंतु शास्त्रीय विचारांची तर या संकुचित मंडळीस भीती वाटते.

वसंता, एखादे लहानसे रोपटे तू उपटून बघ. त्याची मुळे एकाच दिशेला गेलेली दिसतील का? नाही. झाडांची मुळे दशदिशांत जातात. जेथे जेथे ओलावा मिळेल तेथे तेथे जाऊन तो ओलावा घेऊन झाडे उभी राहतात. त्याप्रमाणे आपले जीवन हवे. ज्ञानाचा प्रकाश कोठूनही येवो. त्याचा आपण सत्कार केला पाहिजे. दाही दिशांतून प्रकाश येवो. सर्व खिडक्या मोकळया असू देत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत काय चालते?

अन्य मतांचा वाराही आपल्या संघातील मुलांच्या कानांवर येऊ नये म्हणून तेथे खटपट केली जाते! मी मागे संगमनेर येथे गेलो होतो. सायंकाळी माझे व्याख्यान आहे असे जाहीर होताच संघचालकांनी एकदम आपली मुले कोठेतरी बाहेर नेण्याचा कार्यक्रम ठरविला. तुला हा अनुभव आहेच. तूच मागे आपल्या पहिल्या भेटीत म्हणाला होतास. ‘आमची कीव करा. आम्हाला दुसरे विचार ऐकूच देत नाहीत.’ ती सत्य गोष्ट आहे. मला या गोष्टींचे फार वाईट वाटते.

शत्रूंचा द्वेष, हेच भांडवल

पलटणीतील लोक असतात ना, त्यांना अज्ञानात ठेवण्यात येत असते. सरकार पसंत करील तिच वर्तमानपत्रे मिळाली तर त्यांना मिळतात. नवाकाळ, लोकमान्य, लोकशक्ति, क्रॉनिकल अशी राष्ट्रीय पत्रे पलटणीत जातील का? पलटणीतील शिपायांना पशूप्रमाणे मारामारीसाठी तयार ठेवण्यात येते! गोळी घाल म्हणताच त्यांनी गोळी घातली पाहिजे. सत्य काय असत्य काय, याचा विचार त्यांनी करायचा नसतो. पलटणीत जसे हे विचारशून्य टॉमी तयार करण्यात येतात तसेच आम्हीही आज टॉमी तयार करीत आहोत!

शत्रूंचा द्वेष ही एकच गोष्ट शिपायास सांगण्यात येते. १७८९ च्या फ्रेंच क्रांतीच्या वेळेस फ्रेंच लोक म्हणजे आग लावणारी माकडे आहेत, अशा प्रसार इंग्लंडमध्ये करण्यात येई. एकदा फ्रेंच कैदी लंडनमधील रस्त्यातूंन नेले जात होते. फ्रेंच माणसास खरोखरीच पाठीमागे शेपटे असतात की काय ते पाहण्यासाठी त्यांचे कोट इंग्रज लोक पाठीमागून गंभीरपणे उचलून बघत! विषारी प्रचाराचा असा परिणाम होत असतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणते बौध्दिक खाद्य दिले जाते? वर्तमानपत्रांत मुसलमानांनी केलेले अत्याचार जे येतील, त्यांची कात्रणे म्हणजे यांचे वेद! ‘कृण्वन्तो विश्रमार्यम्’ हे यांचे ब्रीद वाक्य. ‘हिंदुस्थान है हिंदुओं का, नहीं किसी के बाप का.’ हा यांचा महान मंत्र. जर्मनीने ज्यू हद्पार केले. आपणही मुसलमानांना घालवू, हे यांचे स्वप्न. आपली संस्कृती, आपला धर्म किती उच्च!

हे मुसलमान म्हणजे बायका पळवणारे. मुसलमान म्हणजे शुध्द पशु. त्यांना न्याय ना नीती. मुसलमानांना लांडे या शिवाय दुसरा शब्द ते लावणार नाहीत. असा हा मुसलमान द्वेष लहान मुलांच्या मनात ओतण्यात येत आहे. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा दोघांकडून हे पाप होत आहे.

बायबलमध्ये एक वाक्य आहे, ‘माझ्या लहानग्यांना जो बिघडवितो त्याने सर्वांत मोठे पाप केले!’ आज असे पाप आमचे जातीय पुढारी करीत आहेत. त्यांना ना धर्माची ओळख ना संस्कृतीची. एखाद्या जातीचा किंवा धर्माचा द्वेष करणे म्हणजे केवळ मनुष्यद्रोह आहे. भलेबुरे लोक सर्वत्रच आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व लोकांना पशु मानणे म्हणजे बुध्दिचे दिवाळे निघाल्याचे चिन्ह आहे.

१९१४-१८ च्या महायुध्दांत शत्रूकडच्या कैद्यांना सर्वांत चांगल्या रीतीने जर कोणी वागविले असेल तर ते तुर्कस्तानने, असा युरोपिय राष्ट्रांनी निकाल दिला. तुर्की लोक मुसलमान धर्माचेच आहेत. 

हिंदुस्थानांतील मुसलमान हिंदूंतूनच गेलेले असेही आपण म्हणतो. जर हे हिंदी मुसलमान तेवढे वाईट असतील तर आपण हिंदूच वाईट असा त्याचा अर्थ होतो. कारण हे मुसलमान प्रथम हिंदुच होते, असे आपण सांगत असतो. वसंता, पापाचा मक्ता कोणा एका जातीला नाही. हिंदू स्त्रियांना मुसलमान गुंड पळवतात. पुष्कळ वेळा आमच्याच श्रीमंत लोकांना त्या सुंदर स्त्रिया हव्या असतात. मुली किंवा बायका पळविण्याऱ्या टोळया असतात. त्यात हिंदू व मुसलमान दोन्ही प्रकारचे लोक असतात, असे दिसून आले आहे.

मुसलमानांवर टीका करणारे साहेबांबद्दल गप्प

पुष्कळ वेळा हिंदूंच्या रुढीमुळेही हिंदू स्त्रिया अनाथ होतात. जरा वाकडे पाऊल पडले तर त्या स्त्रीला आपण जवळ घेत नाही. जणु आपण सारे पुरुष पुण्यात्मेच असतो! अशा निराधार स्त्रिया मिशनमध्ये जातात किंवा मुसलमान त्यांना जवळ करतात. याचा अर्थ असा नाही की काही मुसलमान गुंड अत्याचार करीत नसतील, परंतु गुंडांना शिक्षा करा. सारे मुसलमान बायका पळविणारे असे म्हणू नका. सबंध जातच्या जात नीच मानू नका. त्यांच्यातही आयाबहिणी आहेत, हे आपण विसरता कामा नये.

जे मुसलमान गुंड असतील त्यांचे शासन होऊ नये असे काँग्रेसने कधीच म्हटले नाही. स्त्रियांवर अत्याचार झाला तर महात्माजी किती संतापतात. मागे मुंबईला ऑस्ट्रेलियन टॉमींनी हिंदी स्त्रियांचा अपमान केला. त्या विरुध्द शेवटी कोणी लेखणी उचलली? उठल्यासूटल्या मुसलमानांच्या काल्पनिक वा अतिशयोक्तीने भरलेल्या अत्याचारांवर टीका करणारे आमचे सारे जातीय हिंदू पुढारी व त्यांची पत्रे मूग गिळून बसली होती.

मुसलमानांवर टीका करतील, परंतु साहेबावर आणि त्यांतल्या त्यांत लढाईच्या काळात डिफेन्स अ‍ॅक्ट चालू असता, कोणी टीका करावी? परंतु महात्माजींनी जळजळीत लेख लिहिला. हिंदी स्त्रियांची अब्रू सांभाळण्यासाठी हाच एक धीरवीर महात्मा उभा राहिला. व्हाइसरॉय का झोपले, सैन्याचे अधिकारी का झोपले, असे त्यांनी विचारले, अणि शेवटी लिहिले, ‘हिंसा वा अहिंसा, स्त्रियांची विटंबना होता कामा नये. हिंदी स्त्रियांच्या अब्रुला धक्का लागता कामा नये. जनतेने तत्क्षणी त्याचा प्रतिकार केला पाहिजे.‘

गुंडांचे पारिपत्य झाले पाहिजे. स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण केले पाहिजे. परंतु तेवढयासाठी संबंधच्या सबंध मुसलमानांस सारख्या शिव्या देण्याची जरुरी नाही. ‘लांडे असेच !’ असे म्हणण्याची जरूरी नाही. आणि आपणही आपल्या स्त्रियांना अधिक उदारपणे वागविले पाहिजे. 

‘कृण्वन्तो विश्रमार्यम्’ याचा अर्थ काय? सर्वांना का तुमच्या धर्माची दीक्षा देणार? सर्वांना का शेंडया व जानवी देणार? जगात केवळ आर्य जात नाही. या देशांतच द्रविडीयन लोक आहेत. ते का आर्य आहेत? आर्य तेवढे चांगले असा अहंकार भ्रममूल आहे. जगाच्या संस्कृतीत सर्व मानवी वंशांनी भर घातली आहे. आज हिटलर म्हणतो की ‘आर्य तेवढे सर्वश्रेष्ठ. ज्यूंना द्या हाकलून. ‘परंतु आईन्स्टाईन सारखे शास्त्रज्ञ ज्यूंत निर्माण झाले. कोणतीही एक जात, कोणताही एक मानववंश इतरांपेक्षा श्रेष्ठ असे नाही. कोणासही अहंची बाधा व्हायला नको. 

खरंच आपण आर्य आहोत?

‘कृण्वन्तो विश्रकार्यम्’ याचा अर्थ इतकाच की आपण सर्व जगाला उदार व्हायला शिकवूया. आर्य म्हणजे दार-चरित. आपण एक जात मुसलमानांना निंद्य म्हणू तर आपणच अनुदार व अनार्य ठरु. आर्य म्हणवून घेण्यास नालायक ठरू. ‘अरिषु साधु: स आर्य:’ शत्रू जवळही जो प्रेमाने वागतो तो आर्य. असा आर्यपणा आपणाजवळ कोठे आहे? आपण आपल्या शेजारी शेकडो वर्षे राहणाऱ्यांना आज पाण्यात बघत आहात. हा का आर्यपणा?

जर्मनीने काही लाख ज्यू लोकांस बाहेर घालविले. आपण आठ कोटी मुसलमानांस कसे बाहेर घालवणार? ते तर शेकडो वर्षें घरेदारे करुन येथे राहिले. हिंदू मुसलमान नवसंस्कृती निर्मित होते. परस्पर प्रेमभाव शिकत होते. जर्मनीचे अनुकरण करणे म्हणजे वेडेपणा आहे. भारताची परिस्थिती निराळी, भारतीय राष्ट्राची परंपरा निराळी, इतिहास निराळा आणि शेजाऱयांस घालवण्यात पुरुषार्थं नाही. त्यांच्याशी मिळते घेऊन सहकार्य करण्याची पराकाष्टा करणे यात मोठेपणा आहे.

आपण मुसलमानांच्या शेजारी शेकडो वर्षें रहात आहोत. सहा हजार मैलांवरून आलेल्या इंग्रजांचे वाङमय आपण आत्मसात केले. आपण इंग्रजीत बोलू लिहू. इंग्रजी ग्रंथातील उतारे देऊ. पाश्चिमात्य संस्कृती आपण पचनी पाडली. मुसलमानबंधू इतकी वर्ष आपल्याजवळ रहात आहेत. परंतु त्यांची भाषा शिकण्याची, त्यांची संस्कृती अभ्यासण्याची, त्यांच्या धर्मांतील चांगुलपणा पाहण्याची बुध्दी आपणास झाली नाही. एक काळ असा होता की ज्या वेळेस हे आपण करीत होतो. हिंदु मुसलमान एकमेकांचे चांगले घेत होते. एकमेकांची भाषा बोलत होतो. परंतु ब्रिटिश आले आणि आपण परस्परांचे शत्रु बनलो. परसत्तेचे मात्र आपण पाय चाटीत बसलो.

फक्त मुसलमानी धर्मच वाईट?

मुसलमानी धर्म का केवळ वाईट? मुहंमद पैगंबरांचीही आम्ही कधीकधी कुचेष्टा करतो. ज्या थोर पुरुषाने वाळवंटातील लोकांत अशी ज्वाला पेटविली की जी क्षणांत स्पेनपासून चीनपर्यंत पसरली, तो पुरुष का शुद्र? तो पुरुष का रंगीला रसूल? जनता कोणाच्या भजनी लागते? जनता शील व चारित्र्य ओळखते. मुहंमद चारित्र्यहीन असते तर आज पंधराशे वर्षे पंचवीस तीस कोट लोक त्यांच्या नादी का राहते? इंग्लंडमधील विश्वविख्यात इतिहासकार गिबन याने मुहंमदाची स्तुतिस्तोत्रे गायिली. गिबनला का कोणी लाच दिली होती? कार्लाईल या प्रसिध्द पंडिताने मुहंमदांवर स्तुती सुमनांजली वाहिली. कार्लाईलला का कळत नव्हते? 

मुहंमद पैगंबर एक ईश्वरी विभूति होते. त्यांना जेव्हा एकाने विचारले, ‘तुम्ही काही चमत्कार करा.’ तेव्हा ते म्हणाले, ‘वाळवंटात मधूनमधून झरे दिसतात. वाळवंटात गोड खजुरीची झाडे आढळतात. समुद्रावर लहानशा होड्याही डौलाने नाचतात. माणसावरच्या प्रेमाने सायंकाळ होताच त्यांची गाईगुरे घरी परत येतात. असे हे चमत्कार सभोवती भरले आहेत. 

मुहंमदांची राहणी साधी. ते पाणी पीत व कोरडी भाकर खात. एकदा शत्रु त्यांच्या पाठीस लागला होता. मुंहमद थकून झाडाखाली झोपले. तो वैरी तेथे आला. त्याने तलवार उपसली. मुहंमद जागे झाले. त्यांनी वैऱ्याकडे पाहिले. वैऱ्याच्या हातची तलवार एकदम गळली. महंमदांनी ती झटकन उचलली व ते म्हणाले, ‘आता मी तुला मारु शकतो. परंतु

टिप्पण्या